Some of my facebook status update (Politics and comedy)



Some of my facebook status update (Politics and comedy)

Its a famous quote by George Orwell from his classic Animal Farm, “All animals are equal, but some animals are more equal than others.” Here the word 'animal' can be rightly substituted with 'people' in context with democracy. Almost all the democracies are run by those people who are more equal. 

Further these so called 'more equal people' can be divided in two categories: intellectuals and morons. When one is incapable of handling such enormous power imparted by the position, funny moments become milestones. Incidences are not restricted to India but to all democracies of the world. As quoted by famous Marathi writer Mr. P. L. Deshpande (PuLa), "Comedy is everywhere, one needs sense". This post is about some incidences I came across in recent time, which has a comic angle.



"‎"तुमच्या या पुढारलेल्या देशात सर्व क्षेत्रांत स्त्री-पुरुष एकाच पातळीवर वावरत असतात. इथल्या स्त्रिया ज्ञानानं, विचारानं, कर्तृत्वानं म्हणजे सर्वार्थानं प्रगत आणि प्रगल्भ आहेत, असं असूनही आजवर एकही स्त्री अमेरिकेची अध्यक्ष का झाली नाही?

एका चतुर अमेरिकी माणसानं मोठ्या मिस्कीलपणे उत्तर दिल ः

"त्याचं काय आहे? अमेरिकी घटनेनुसार अध्यक्ष होण्यासाठी स्त्री वा पुरुषाचं वय किमान 32 असावं लागतं;
पण आमच्यातली एकसुद्धा स्त्री बत्तीशी ओलांडल्याचं मान्यच करत नाही.'"




________________

"सत्तरच्या दशकात अल्सरच्या त्रासामुळे त्यांच्या पोटाचं ऑपरेशन झालं. खासदाराला वैद्यकीय खर्चाचा परतावा तेव्हाही मिळे, पण त्यासाठी फक्त राम मनोहर लोहिया रुग्णालयातच उपचार घेण्याची मुभा होती. त्या वेळी या रुग्णालयात रुग्ण दगावण्याची प्रकरणे संसदेत व संसदेबाहेरही सर्वत्र गाजली होती. आमचा ऑपरेशन खर्चाचा परतावा नामंजूर झाला तेव्हा त्या वेळच्या आरोग्यमंत्र्यांना, म्हणजे डॉ. करणसिंगांना अटलजींनी अवघ्या एका ओळीचं पत्र पाठविलं. त्यात लिहिलं,

''मंत्रीजी, मुझे अपना इलाज करवाना था, अंतिम संस्कार नहीं!''

आरोग्यमंत्री समजायचं ते समजले आणि ते बंधन दूर झालं!"


______________


पु. ल. म्हणतात "विनोद सर्वत्र आहे, नजर हवी.

उदा. आजची म टा मधील बातमी : बारामती साबरमतीच्या विचारांवर चालते! : राष्ट्रवादी"



________________



"‎" ढुंगणा खालची खुर्ची काढून घेतली तर यापैकी एकालाही रत्नागिरीच्या धक्क्यावर हमाल म्हणून देखील कोणी आपला बोजा देणार नाही, ते राष्ट्राचा भार घ्यायला निघालेत "....."


________________



"काही लोकांची प्रवृत्तीच बनवेगिरीची असते. लफंगेपणा भयानक असतो. विश्वासाला तडा देणारा असतो. एखादी बाई येऊन सांगते, 'नवरा नाही, एकुलता एक मुलगा जागा बळकावून बसलाय. मी फुटपाथवर पडली आहे.'


मग आम्ही अन्याय-अत्याचाराने कळवळतो आणि प्रकरणात हात घालतो तर कुणाकडून कळते की,

या 'बाई रोज सी. सी. आय.च्या क्लबवर पत्ते खेळायला असतात. आता बोला!"


_____________


एकदा मध्यरात्र उलटून जात असताना घरचा फोन ठणाणला . फोन उचलला , तर समोरून धीरगंभीर आवाज आला ,

' मी सुभाष नागरे बोलतोय '.

बाळासाहेबांचा आवाज ओळखणे कठीण नव्हते . पण , इतक्या रात्री फोन का ?... तर समोरून खळाळणारे हास्य . ' का घाबरलास की काय ?'... ' तसं नाही , पण काही काम होतं का ? काही गडबड ?' त्यांना अडखळतच विचारलं , तर म्हणाले , ' काहीही गडबड नाही आणि तुला कुठलीही बातमी नाही . पण एक सांग तू सिनेमा पाहिलास ?'... ' हो तर , प्रीमियरलाच गेलो होतो .' ' कसं वाटलं माझं कॅरक्टर ? जमलंय का अमिताभला ?' आणि मग पुन्हा हसण्याचा खळखळाट . त्यानंतर बराच वेळ ते ' सरकार ', स्वत : ची मानसिकता , अशा वादांमुळे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या कुटुंबांमध्ये निर्माण होणारे वादंग , या आणि अशा अनेक छोट्या - मोठ्या विषयांवर बाळासाहेब बोलत राहिले . फोन ठेवला , तेव्हा रात्रीचा दीड वाजून गेला होता .

पण फोन बंद करताना , ' असा रात्री - अपरात्री फोनवर बोलत राहू नकोस . घरात गडबड होईल ', असा दम भरत पुन्हा हसायला ते विसरले नाहीत .

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17274049.cms

___________________


मनमोहन सरकारचा ‘पुरस्कार घोटाळा’

प्रख्यात छायाचित्रकाराला दुसर्‍यांदा ‘पद्मश्री’ -

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कालखंडातील प्रख्यात छायाचित्रकार सुनील जनाह हे सध्या ९४ वर्षांचे असून कॅलिफोर्नियात व्हीलचेअरला जखडलेले आहेत. पश्‍चिम बंगालमधील ४० लाख लोकांचा बळी घेतलेल्या भयाण दुष्काळाचा आँखो देखा हाल कॅमेर्‍यात बंदिस्त करणार्‍या त्या छायाचित्रकाराची दृष्टीही आता अधू झाली आहे. पण दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजवटीत १९७२ सालीच ‘पद्मश्री’ मिळवलेल्या जनाह यांना प्रजासत्ताक दिनी मनमोहन सरकारने दुसर्‍यांदा ‘पद्मश्री’ किताब जाहीर केला आहे.

छायाचित्रकार सुनील जनाह यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारच्याच सांस्कृतिक मंत्रालयाने ‘पद्मभूषण’ पुरस्कारासाठी केली होती, पण त्यांना ‘पद्मश्री’ किताबच पुन्हा देण्याची घोडचूक सरकारकडून घडली आहे. या आधी हाच किताब देताना त्यांचे आडनाव जनथ असे नोंदवले होते. तसेच ते दिल्लीतील रहिवासी असल्याचे नमूद करण्यात आले होते. तर आता सरकारी दरबारी त्यांचे आडनाव ‘जनाह’ असे असून जन्माचे ठिकाण म्हणून आसामची नोंद आहे. नाव-पत्त्यातील या तफावतीमुळे त्यांना १९७२ सालीच तो किताब मिळाल्याचे दुर्लक्षित झाले असावे, असे सांस्कृतिक खात्याचे अधिकारी आता सांगत आहेत.
हिंदुस्थानचे हे वैशिष्ट्यच

एखाद्या नामवंताला पुरस्कार देण्याचे सोपस्कार उरकले म्हणजे सरकारचे कर्तव्य संपते. मग ती असामी कशी विस्मृतीच्या पडद्याआड जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे.
- शोभा जनाह

_______________


"एका स्टेशनवर ट्रेन थांबते. ट्रेनमधला प्रवासी प्लॅटफॉर्मवरच्या प्रवाशाला विचारतो, 'कोणतं स्टेशन आहे?

' प्लॅटफॉर्मवरचा प्रवासी तोंडाचा पट्टा सुरू करतो.....

'बाहेर येऊन बघ की स्वत: जरा... डोळे फुटले का?... सगळं आयतं पाहिजे...' ........#$%^$%

ट्रेनमधला माणूस म्हणतो, 'अरेव्वा, पुणं आलं वाटतं"

________________



"Interesting, our system doesen't want qualified people ! Now its everywhere! here is an example :

महापालिका प्रशासनाने शिपाई आणि बिगारी या पदांसाठी पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता असलेली व्यक्तीही अर्ज करू शकते , असे सुचविले होते. मात्र , त्यामध्ये बदल करून दहावी नापास झालेली व्यक्तीच या पदासाठी अर्ज करू शकते , अशी उपसूचना पक्षनेत्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे यापुढे महापलिकेत शिपाई किंवा बिगारी या पदावर नोकरी करण्यासाठी दहावी नापास व्हावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे."

____________________


१९८५ मध्ये माझ्या ज्या पत्रकार मित्राने बडय़ा उद्योगपतीच्या प्रदूषणकारी प्रकल्पावर ‘ स्टोरी ’ करण्याचे ठरविले होते, तो आजही कष्टप्रद जीवन जगतो आहे, परिस्थितीशी झगडत दिवस काढतो आहे. या व्यवसायात ३५ वर्षे कार्यरत राहून सुध्दा त्याने आपली जिद्द सोडलेली नाही. प्रामाणिकपणा, नीतीमत्ता शाबूत ठेवलेली आहे. अलिकडेच त्याने ‘पेड न्यूज’ संबंधात प्रेस कौन्सिलकडे आपले म्हणणे सादर केले आहे,तसेच कर्नाटकमधील एका भू-माफियावर, खाणमाफियावर (त्याच्या कृष्णकृत्यांवर प्रकाश टाकणारा ) एक चित्रपट तयार केला आहे.

.. आणि २७ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ भोजनप्रसंगी माझ्या या प्रामाणिक मित्राला प्रदूषणकारी प्रकल्पावर ‘स्टोरी’ न करण्याचा सल्ला देणारा आणि वृत्तपत्रात काय प्रसिध्द व्हावे आणि काय होऊ नये हे ठरविण्यात जाहिरातदारांचाही सहभाग असायला हवा असे सांगणारा माझा तो दुसरा मित्र आज कोठे आणि कसा आहे हे जाणून घ्यायचे आहे ? .. तो आज भारतीय जनता पार्टीचा खासदार ( राज्यसभा सदस्य ) आहे.. !

Read More here....http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=227754%3A2012-05-19-17-53-50&catid=55%3A2009-07-20-04-00-45&Itemid=13"

________________


"लोकशाहीत सगळे समान असले तरी काही अधिक समान असतात - जॉर्ज ऑरवेल


____________



"मंत्रालयातील आग हे कारस्थान नाही हे लक्षात घेण्यासाठी एकच युक्तिवाद पुरेसा आहे. आगीचा झपाटा व महत्त्वाची खात्यांची राखरांगोळी करण्याची अचूकता पाहता गलथान सरकारकडून असे काम होणे शक्यच नाही.
पण सरकारच्या गलथानपणावर इतका विश्वास हीसुद्धा एक अंधश्रद्धाच.
टाईप-२ एरर..!

Ref: Loksatta http://tinyurl.com/andhshradha"


_______________


Some important work that Indian MP's do:


1. Changing the name of the cities

2. Looking for any controversial matter of various sorts at various level (recent matters: Name of beer, cartoons)

3. Increasing salaries of President, PM and MPs and sanctioning new concessions to themselves

4. Creating new states
5. Demanding resignations of ministers and PM after media discovering new scam / scandal
6. Condemn the allegations against them and sending notices to the concerned person
7. Visiting different nations "to study" something. readers can add to the list :-)

By Paresh Kale

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !