Showing posts with label inspirational. Show all posts
Showing posts with label inspirational. Show all posts

खुदगर्ज़

उम्मीद पुख्ता हो तो तस्वीर बने शानदार

घुलने के बाद अक्सर, ये रंग बदल जाते है ।


लगाए कश्ति एक माहिर माझी साहिल पार

हौसले बुलंद रखो, ये मौसम बदल जाते है ।


मासूम बेरहम वक्तसे बड़ा न कोई जादूगर

तुम मेरा दिल परखो, ये चेहरे बदल जाते है ।


कामसे काम रखते है, परवाह उम्मीद न कर

समयकी बात है प्यारे, ये लोग बदल जाते है ।


खुदगर्ज दुनिया खिंची आये रुपिया देखकर 

जब हालात बिगड़े, तो ये रिश्ते बदल जाते है ।


जिस्म मुजस्सिम, बस तौसीफ है हमसफर

मिट्टी में मिलने के बाद ये मुर्दे बदल जाते है ।



उड़ान

 

ये साकित आसमा, बे-हद है

उड़ान तेरे मनका दायरा है।  


चढ़ते सूरज से रुबरु करले ,

कामयाबी तेरी परछाई है  | 


उम्मीद के पर मजबूत तू कर ,

शहर की हवा थोड़ी खराब है | 


तू अक़ाब है , उंचाइसे न डर 

याद रहे, आखरी पड़ाव जमी है !

                                         




Kahi Katha - 11



काही कथा - 11



नेटवर वाचलेल्या काही प्रेरणा देणारया , नितिकथा तुमच्यासाठी !










अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या नावाने एक गोष्ट सांगितली जाते. एकदा हिटलर आपल्या कार्यालयाच्या ग्रंथालयात काही पुस्तकं चाळत होता. एका उंच कपाटाच्या वरच्या कप्प्यातील एका पुस्तकानं त्याचं लक्ष वेधलं आणि ते काढण्यासाठी त्यानं टाचा वर केल्या, पण त्याचा हात पुस्तकापर्यंत पोहोचतच नव्हता. 

त्याचे प्रयत्न सुरूच होते. 

त्याच्यासोबतचा एक अधिकारी ते पाहून नम्रपणे म्हणाला, ‘‘थांबा सर, मी काढून देतो ते पुस्तक. मी तुमच्यापेक्षा मोठा आहे!’’ 

हिटलरने ते शब्द ऐकले. त्याच्या चेहऱ्यावर तुच्छतेची एक रेषा गडद झाली. डोळ्यांत काहीसा संताप उतरला आणि तो रागाने त्या अधिकाऱ्याला म्हणाला, 

‘‘उंच म्हण, मोठा नव्हे!’’








एकदा गांधीजिंना विचारले "बापू आपणास अस का वाटते कि आपण इंग्रजांशी यशस्वी लढा देवू शकाल ?" 

गांधीजी हसले आणि म्हणाले "आपण जिंकूच कारण आपण आपल्या चार टप्प्यांच्या लढाईच्या तिसऱ्या टप्प्यात आहोत." 

" चार टप्प्यांची लढाई ? " 

" हो, प्रथम ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. 
मग ते तुम्हाला हसण्यावारी नेतात. 
तिसऱ्या टप्प्यात ते तुमच्याशी युद्ध पुकारतात. 

चौथा टप्पा - तुम्ही लढाई जिंकता. "






The European Union commissioners have announced that agreement has been reached to adopt English as the preferred language for European communications, rather than German, which was the other possibility. As part of the negotiations, Her Majesty's Government conceded that English spelling had some room for improvement and has accepted a five-year phased plan for what will be known as EuroEnglish (Euro for short).

In the first year, "s" will be used instead of the soft "c." Sertainly, sivil servants will resieve this news with joy. Also, the hard "c" will be replased with "k". Not only will this klear up konfusion, but typewriters kan have one less letter.

There will be growing publik enthusiasm in the sekond year, when the troublesome "ph" will be replased by "f". This will make words like fotograf" 20 persent shorter.

In the third year, publik akseptanse of the new spelling kan be expekted to reach the stage where more komplikated changes are possible. Governments will enkorage the removal of double letters, which have always ben a deterent to akurate speling. Also, al wil agre that the horible mes of silent "e"s in the languag is disgrasful, and they would go.

By the fourth year, peopl wil be reseptiv to steps such as replasing "th" by "z" and "w" by " v".

During ze fifz year, ze unesesary "o" kan be dropd from vords kontaining "ou", and similar changes vud of kors be aplid to ozer kombinations of leters.

After zis fifz yer, ve vil hav a reli sensibl riten styl. Zer vil be no mor trubls or difikultis and evrivun vil find it ezi tu understand ech ozer.

Ze drem vil finali kum tru


काही कथा ! -10


काही कथा ! -10

नेटवर वाचलेल्या काही प्रेरणा देणारया , नितिकथा तुमच्यासाठी !





मध्यंतरी शीतपेये विकणाऱ्या एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘सीईओ’पदी एका भारतीय महिलेची निवड झाली. 

तिला पत्रकारांनी प्रश्‍न विचारला: ‘‘तुम्ही भारतीय आहात. भारताविषयी काय वाटतं?’’ 

ती चटकन म्हणाली: ‘‘यू नो...इंडिया इज बिग मार्केट...’’

उत्तर ऐकून खूप वाईट वाटलं होतं. प्रत्येकाला विकासाचं, स्थलांतराचं स्वातंत्र्य आहेच. ते टिकलंच पाहिजे; पण ते उपभोगताना आपला देश भंगारातला तुकडा व्हायला पाहिजे, असं काही नाहीय... 






टीव्ही नुकताच रुजू होत होता, तेव्हा ‘सकाळ’नं एक व्यापक सर्वेक्षण केलं होतं. 
लहान मुलांसाठी एक प्रश्‍न विचारला होता:

‘‘आपली आई कशी असावी, असं तुम्हाला वाटतंय?’’ 

बहुसंख्य पोरांनी उत्तर दिलं होतं:
‘‘टीव्हीवर धुण्या-भांड्याचा साबण विकणाऱ्या सुंदर बाईसारखी...’’



 


एका आखाती देशाची राणी माझी मैत्रीण होती. ती खूप सुस्वभावी होती; पण तिची सल्लागार अतिशय उर्मट व अरेरावी करणारी होती. अरब देशात सर्वच राजे-राण्या आपले सल्लागार युरोपातून व अमेरिकेतून आणतात. त्यांना मोठा पगार, प्रशस्त हवेल्या व आभाळाएवढं महत्त्व देतात. त्यामुळं अनेकदा स्वतः शेख, राजा, राणी हे चांगले असतात; परंतु त्यांचा चांगुलपणा लोकांना माहीत होत नाही. 

त्या सल्लागार महिलेला तीन पुत्र होते. त्यांची वयं १४, १६ व १८ वर्षं. तिघंही शाळेत जायचे. प्रत्येकाकडं मर्सिडीज होती. मुलं तर आईपेक्षा वस्ताद. आखातातल्या तेलाच्या सगळ्या खाणी आपल्याच मालकीच्या आहेत, अशा थाटात ती वागत असत.


एके दिवशी दुपारी मला फोन आला. पलीकडून फोन करणारा म्हणाला ः ‘‘एक दुःखद  बातमी आहे. राणीसाहेबांच्या सल्लागार महिलेचं तिन्ही पुत्र एकाच फटक्‍यात ठार झाले.’’ 


तर वाचाच बंद झाली. मी थोड्या वेळानं स्वतःला सावरलं व विचारलं ः ‘‘नेमकं काय झालं?’’ 

पलीकडून बोलणारी व्यक्ती म्हणाली ‘‘दुपारी तिघांनी आपापली मर्सिडीज काढली व कमाल मर्यादेच्या बाहेर जाऊन गाड्या एकमेकींवर आदळण्याचा खेळ सुरू केला. नोकरांनी आईला ऑफिसमध्ये फोन करून कळवलं, तर तिनं नोकरांनाच दटावलं. मर्सिडीज गाडी दणकट असल्यानं गाड्यांना फार काही झालं नाही. मुलांना चेव आला व शेवटी त्यांनी कल्पनेच्या पलीकडं जाऊन गाड्यांमध्ये काय केलं ते कळलं नाही; पण तिन्ही गाड्या एकमेकींवर आदळल्या व तिन्ही भाऊ जागच्या जागीच ठार झाले.’’
http://tinyurl.com/zahm495



 


रशियाचं सोव्हिएत युनियन असताना त्याचा सर्वेसर्वा असलेल्या स्टॅलिननं पुष्कळ जुलूम केले. विरोधकांचं शिरकाण केलं; पण त्याच्या हयातीत त्याला उलट बोलायला कुणी धजत नव्हते. 

पुढं क्रुश्‍चॉव्हची राजवट आली, तेव्हा त्यानं स्टॅलिनच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचला. 

त्याच्या भाषणानंतर ‘श्रोत्यांचा प्रतिसाद यावा’ असं आवाहन त्यानं केलं, तेव्हा एका चिटोरीवर लिहिलेला एक निनावी प्रश्‍न त्याच्याकडं आला. त्यानं तो जाहीरपणे वाचला. 

तो प्रश्न असा होता: ‘जेव्हा स्टॅलिन हे सगळे जुलूम करत होता, तेव्हा त्याला तुम्हा लोकांनी विरोध का नाही केला? तुम्ही गप्प का राहिलात?’ 

स्टॅलिनच्या सहकाऱ्यांत क्रुश्‍चॉव्ह असल्यानं हा विचारला गेलेला प्रश्‍न बरोबर होता. हा प्रश्न वाचून झाल्यावर क्रुश्‍चॉव्हनं विचारलं  ‘‘ज्या व्यक्तीनं हा प्रश्‍न विचारलेला आहे, ती हात वर करेल का?’’ 

सभेत शांतता होती; पण कुणीच हात वर केला नाही, तेव्हा स्मित करत क्रुश्‍चॉव्ह म्हणाला: ‘‘आता तुम्हाला उत्तर मिळालं ना?’’

http://goo.gl/AaRlXi







एकदा प्रख्यात शास्त्रज्ञ हिल्बर्ट यांची भेट घेण्याची संधी उष्मागतिकीशास्त्रात महत्त्वाचा शोध लावणाऱ्या नर्न्स्ट यांना मिळाली. 

हिल्बर्ट आता वृद्ध होत चालले होते. ते बोलता बोलता म्हणाले ः ‘‘म्हातारपणामुळं माझी कार्यक्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.’’

‘‘असं का?’’ नर्न्स्ट साहेब उद्‌गारले: ‘‘माझा अनुभव वेगळाच आहे. माझी कार्यक्षमता दिवसेंदिवस वाढत आहे.’’

‘‘तसं असेल तर एक दिवस असाही येईल, जेव्हा तुम्ही माझ्याइतके कार्यक्षम व्हाल.’’ 

हिल्बर्ट यांनी नर्न्स्ट यांना शांतपणे हरभऱ्याच्या झाडावरून खाली ओढलं !

http://tinyurl.com/hhohp8h





Role of chess - Quotes from Kasparov



Role of chess - Quotes from Kasparov


Garry Kasparov, the chess legend, was in the capital of India at the invitation of Entrepreneurs’ Organisation which organised the RIE 2016 event. In his interview with EO president Vibhas Prasad, talked about his life, politics, and Indian Chess and also answered the questions put up by the audience. Here are some inspiring quotes reproduced from his interview.




Chess and politics are different. In chess there are predictable moves and unpredictable results.


The first step towards decision-making is to know who you are and create an environment of good decision-making. In most cases, vital decisions will be made under time pressure.



At the end of the day it is about how you use your dominant qualities to create favorable conditions.



You need to be in good physical shape to guide your intuition. You need to trust your gut feeling.

Today the fear of making a mistake is great. That pulls you back. You have to take risks.



Chess is a reflection of the society and should be part of family culture to become a mass sport.






News Source: The Hindu article on 20th Feb
Image Source: Wiki


काही कथा - ९





काही कथा - ९

नेटवर वाचलेल्या काही प्रेरणा देणारया , नितिकथा तुमच्यासाठी !








एक गणेशभक्त महात्मा होते. रोज मातीच्या गणेशमूर्तीची पूजा करीत. 

एका शिष्याने त्याना पूजेसाठी सोन्याची गणेशमूर्ती बनवून आणली. ज्या भावनेने मातीच्या मूर्तीची पूजा करीत, त्याच भावनेने सोन्याच्या मूर्तीची पूजा करू लागले. 


दुसऱ्या शिष्याला वाटले, आपण गणपतीसाठी सोन्याचा उंदीर बनवावा. म्हणून त्याने गणपतीपेक्षा मोठा उंदीर बनवून आणला. 


पूजा चालूच राहिली. कालांतराने महात्मा वयोवृध्द झाले. त्यांना वाटले, आपल्या मृत्यूनंतर शिष्यांमध्ये मूर्तीवरून भांडण नको. त्यापेक्षा मूर्ती विकून मिळणारा पैसा इश्वरार्पण करून मुक्त होऊ. सोनाराकडे घेऊन गेले. गणपतीची मूर्ती दोन तोळे अन् उंदीर अकरा तोळे सोन्याचा ! 


सोनार गणेशमूर्तीपेक्षा उंदराच्या मूर्तीचे जास्त पैसे देऊ लागला. 


तेव्हा महात्मा आश्चर्याने म्हणाले, "अरे, गणपती तर देव आहे आणि उंदीर क्षुल्लक प्राणी. तरी तू देवाची किंमत कमी का देतोस ?" 


सोनाराने उत्तर दिले, " मी किंमत सोन्याची देतोय. देवाची किंवा उंदराची नाही."










जे जे सरकारी अधिकारी, मंत्री भेटले सिंगापूरमध्ये- ते सगळेच्या सगळे नियोजन आणि अंमलबजावणी याला पुण्यकर्मच मानतात. या भेटीत एक बडा सरकारी अधिकारी भेटला. त्याच दिवशी सकाळी तो भारतातनं परतला होता. मोदींच्या सिंगापूर भेटीची तयारी करण्यासाठी तो भारतात आला होता. 


त्याचा परतीचा प्रवास लांबला. त्याच्या गळ्यातल्या बॅगेवर इकॉनॉमी क्लासचा टॅग तसाच होता. 

मी म्हटलं, ‘तुमची बॅग तेवढी इकॉनॉमी क्लासनं आली का?’ 

तो म्हणाला, ‘नाही. मीच इकॉनॉमी क्लासने आलो.’ 

मला आश्चर्य वाटलं. त्याचा हुद्दा लक्षात घेता तो इकॉनॉमी क्लासमध्ये कसा, हा प्रश्न! त्याचं उत्तर त्यानंच दिलं. 

तो म्हणाला, ‘आमच्याकडे नियम आहे. विमानप्रवासाचा वेळ सहा तासांपेक्षा कमी असेल तर सर्वच जण इकॉनॉमी क्लासने जातात. अगदी लोकप्रतिनिधीसुद्धा. दिल्ली-सिंगापूर विमानप्रवासाचा वेळ पाच तास ४५ मिनिटं आहे. त्यामुळे इकॉनॉमी क्लास.’ 

मी म्हटलं, ‘१५ मिनिटांचा तर फरक..’ 

वाक्य पूर्ण व्हायच्या आत तो म्हणाला, ‘ही वेळ ५ तास ५९ मिनिटं असली तरी नियम तोच. आणि सगळ्यांनीच पाळायचा. विमान उशीराच आलं, वेळ लागणार आहे, या सबबी आम्ही देत नाही. आणि दिल्या तरी त्या ऐकल्या जात नाहीत.’ 

नंतर तो सांगत होता- एकदा तो दिल्ली-दुबई मार्गावर एअर इंडियानं प्रवास करत होता. तर त्या दिवशी कोणी मंत्री येणार म्हणून विमानाचं उड्डाण लांबवलं गेलं. त्याच्यासाठी फर्स्ट क्लासच्या अनेक केबिन्स रिकाम्या ठेवल्या गेल्या. आणि एवढं करून तो आलाच नाही. आणि तासाभराच्या विलंबानं त्या रिकाम्या सीट्स घेऊन विमान दुबईला निघालं. 


तो म्हणाला, ‘आम्हाला ही चन परवडत नाही. आम्ही काही तुमच्याइतके सधन नाही.’ 


- इति गिरीश कुबेर (लोकसत्ता दि. २२/११/२०१५)









आइन्स्टाइनचे सहकारी इन्फेल्ड यांनी आत्मचरित्रात म्हटलं आहे, की प्रिन्स्टनमध्ये असताना आइन्स्टाइनला त्याच्या गणिती आकडेमोडीतून एक महत्त्वाचा निष्कर्ष काढता आला. तो हा की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असू शकत नाहीत.

निष्कर्ष महत्त्वाचं असल्यानं त्यावर आइन्स्टाइननं सेमिनार द्यावं असं ठरलं व भाषणाची निनावी नोटीस निघाली. ‘निनावी’ याकरिता, की जर व्याख्याता म्हणून आइन्स्टाइनचं नाव नोटीसमध्ये आलं, तर व्याख्यानाला प्रसारमाध्यमं उगाच गर्दी करत असत. मात्र, व्याख्यानाच्या एक दिवस आधी आइन्स्टाइनला आपल्या गणितात चूक दिसली. ती दुरुस्त करता करता त्याचा मूळ निष्कर्ष बाद ठरला.


सेमिनार देताना आइन्स्टाइननं आपलं सगळं गणित मांडलं. त्यातली चूक दाखवली आणि ती दुरुस्त करताना मूळ निष्कर्ष कसा बाद ठरतो, हे सर्व प्रांजलपणे दाखवलं!



- जयंत नारळीकर  (सकाळ  दि. ६/१२/२०१५)









काही कथा : भाग ८







काही कथा : भाग ८


एका गावात भिकारी राहत असतो. आपण लग्न करावे, म्हणून तो विचार करतो. अनुरूप पत्नी शोधतो. लग्नासाठी पैसे लागणार त्यासाठी तो उत्तरेकडे पुरून ठेवलेल्या एका कवडीच्या शोधात निघतो. 

एका ठिकाणी शोधमोहीम सुरू असताना तिथे राजाची स्वारी येते. राज्याचा पोशिंदा आल्यामुळे सगळे लोक स्वागत करत असतात, पण एवढ्या गर्दीत दोनजण राजाकडे न पाहता खाली वाकून काहीतरी शोधताना दिसतात. हे पाहून राजा आश्चर्यचकित होऊन प्रधानाकरवी भिकारी व त्याच्या भावी पत्नीला दरबारात बोलावून घेतो. 

राजा त्या भिकाऱ्याला विचारतो, "सगळे लोक माझे स्वागत करत असताना तुम्ही दोघे तिकडे काय करत होतात?"

त्यावर भिकारी म्हणतो, "मला लग्न करायचे आहे. त्यासाठी मी कवडी शोधत होते. "

राजा विचारतो, " अरे मग त्याला कवडीची गरज काय ? त्याऐवजी मी तुला एक सोन्याचे नाणे देतो."

त्यावर भिकारी नकार देतो. एक एक म्हणत राजा १६ हजार सोन्याची नाणी देऊ करतो. पण भिकारी मान्य होत नाही. अखेरीस राजा म्हणतो की माझे अर्धे राज्य तुला देतो. हे ऐकून भिकाऱ्याची भावी पत्नी म्हणते, "हा राजा लहरी दिसतो. १६ हजार सोन्याची नाणी नाकारल्यानंतरही त्याने अर्धे राज्य देण्याचे जाहीर केले. कबूल करा." 

तिचे म्हणणे ऐकून भिकारी होकार देतो. राजाही समाधान व्यक्त करतो. त्यानंतर राजा त्या भिकाऱ्याला म्हणतो, "की आता तू अर्ध्या राज्याचा मालक झाला आहेस. माझ्या बरोबरीने आहेस. चल आपण दोघे जेवण करू."

भिकारी म्हणतो, "ठिक आहे. माझी हरकत नाही. तुम्ही चला पुढे मी आलोच."

राजा पुन्हा आश्चर्याने म्हणतो, "आता तू कुठे निघालास ?"

भिकारी म्हणतो,"माझी कवडी उत्तरकडे पुरून ठेवली आहे. ती शोधून आणतो."







साधारण २५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कुठल्याशा मालिकेचं शूट सुरू होतं. त्यात मुख्य कलावंत होते लक्ष्मीकांत बेर्डे, अर्थातच लक्ष्या. 

मालिकेत लक्ष्याचं शूट सुरू असलं की एंट्रीला अजून अवकाश असलेले कलाकार आराम करत असत.

एकदा लक्ष्याचा सीन सुरू असताना, टीममधल्या दोन कलाकारांनी मेकअप चढवला आणि एंट्रीला अवकाश असल्याने हे दोघेही थेट झोपी गेले. सीनमध्ये असलेल्या लक्ष्याला ही गोष्ट 'दिसली'. दिग्दर्शकाला थांबवून त्याने सरळ पुढे येत दोघांना जागं केलं. 

म्हणाला, " तुम्हाला झोपायचं असेल तर चेहऱ्याला रंग चढवण्याआधी झोपा. एकदा हा रंग लागला की असं आडवं व्हायचं नाही. अन्यथा, रंगदेवता तुम्हाला झोपवेल."








काही कथा - भाग ७





काही कथा - भाग ७



दांडी सत्याग्रहाची घोषणा केल्यानंतर महात्मा गांधी यांना मोतीलाल नेहरू (राहुल गांधी यांचे खापर पणजोबा) यांनी लांबलचक पत्र लिहिले. त्यात दांडी सत्याग्रहामुळे काहीही साध्य होणार नाही; तो कसा फसेल आदी मुद्दय़ांचा ऊहापोह केला. 
गांधीजींनी पत्राचे उत्तर दिले- 'कर के देखो, तुम्हारा बापू.' 

नेहरू नाराज झाले. पण नेत्याची इच्छा ही आज्ञा मानून त्यांनी दांडी सत्याग्रहाच्या स्थान व वेळेची घोषणा केली. सत्याग्रहाच्या दिवशीच रेल्वे स्थानकावर मोतीलाल नेहरू यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अटक केली.

तुरुंगात जाण्यापूर्वी नेहरू यांनी गांधीजींना तार पाठवली. 

त्यात म्हटले होते- 'प्रिय बापू, बिना किये ही देख लिया!' 


गांधीजींना जनमानसाची नाडी माहिती होती. कारण ते लोकांमध्ये मिसळत होते. 












लेबनीज लेखक खलील जिब्रानची रूपककथा आहे. 


सुरूपता आणि कुरूपता या दोन बहिणी, स्नानासाठी तलावात उतरल्या. वस्त्रं तळ्याच्या काठावर ठेवली होती. पाण्यात त्या मनसोक्त डुंबत होत्या. इतक्यात कुरूपतेला काहीसं आठवलं..... 

ती लगबगीने तळ्याबाहेर आली. तिने सुरूपतेची वस्त्रं अंगावर चढवली आणि निघून गेली. 

सुरूपता अजूनही पाण्यात डुंबतच होती. यथावकाश तीही पाण्याबाहेर आली; तर तिला दिसलं... की, कुरूपतेची वस्त्रं काठावर आहेत. ती घालून बाहेर पडण्याशिवाय तिला गत्यंतर उरले नाही. 

तेव्हापासून भलंबुरं ओळखण्यात माणसाची गल्लत होऊ लागली.










साऱ्या सरोवरांचा मान असलेल्या मानसरोवरात विहरणारा हंस आणि तळ्यात व समुद्राच्या काठाकाठाने फिरणारा बगळा यांचा हा संवाद. 

बगळा विचारतो. 'तू कोण आहेस ?' इतका शुभ्र... माझ्यापेक्षा कणभर अधिकच शुभ्र असा तू कोण? कोठला? 
हंस उतरतो, 'मी तो आहे.... ज्याचे डोळे पाय आणि चोच लाल आहेत' 

हंसाच्या उत्तरावर बगळ्याचा पुढचा प्रश्न. 'तू कोठून आलास?'

हंस म्हणाला 'मानसरोवरातून!' 

बगळ्याने ते कधी ऐकलंच नव्हतं. तो म्हणाला, 'काय आहे हे' 

हंस म्हणाला, 'तेथे सुवर्णकमळे डुलतात पाण्यावर, आणि पाणी इतकं गोड आहे की अमृतच. आणि सर्वत्र मोतीच मोती विखुरलेले. तो मोत्यांचा चारा मी खातो,' 

बगळ्याने असे कधी ऐकलेले नव्हते. 
तो म्हणाला, ...ते ठीक आहे हो! पण त्या सरोवरात कीटक आणि मासे असतात का? खाण्यासाठी माशांसारखं काय काय मिळतं?




Note: Stories are collected from internet pages and edited. Stories are published on the blog merely to inspire people. No copyright violation intended.

काही कथा - भाग 6



काही कथा - भाग 6




एकदा एक गुराखी चरण्यासाठी जंगलात घेऊन गेला होता. गुरांना चरण्यासाठी सोडून दिल्यावर एकटाच एका झाडाखाली बसला. वेळ घालवण्यासाठी म्हणून जवळच पडलेल्या एका दगडाने दुसऱ्या दगडावर आघात करू लागला. दोन-तीन आघात झाल्याबरोबर तो दगड तुटला व थोडय़ा अंतरावर जाऊन पडला.

गुराख्याने दुसरा दगड घेतला व आता या दगडावरही तो तसेच आघात करू लागला. या दगडाने मात्र ते सर्व घाव सहन केले व आश्चर्याची गोष्ट म्हणजे संध्याकाळपर्यंत त्या दगडाचे एका सुंदर मूर्तीत रूपांतर झाले. त्या गुराखीने ती मूर्ती तेथेच ठेवली व गुरांना घेऊन निघून गेला.

रस्त्यावरून जाणाऱ्या शेतमजुरांना जेव्हा ती मूर्ती दिसली तेव्हा त्यांना वाटले की हा तर चमत्कारच झाला. सकाळी तर येथे मूर्ती नव्हती. प्रभूने आपल्यासाठीच ही मूर्ती पाठवली असेल. अवश्य आपणास या मूर्तीसाठी मंदिर बनवावे लागेल, असे म्हणून ग्रामस्थांनी सगळ्यांच्या सहयोगाने तेथे मंदिर बनवून त्यात या मूर्तीची स्थापना केली.


या मूर्तीवर वाहण्यासाठी नारळ फोडायला दगड हवा होता म्हणून एक ग्रामस्थ खाली पडलेला एक दगड उचलतो, तर तो तोच दगड असतो जो त्या गुराख्यांच्या फक्त दोन-तीन प्रहारांनी तुटलेला असतो. त्याला मंदिराच्या दरवाजाजवळ ठेवले जाते.

आता रोज त्याच्यावर नारळ फोडले जातात. एकदा कुणीही नसताना त्या मूर्तीने अचानक दरवाजातील दगडाला विचारले,

'काय मित्रा, कसा आहेस?'

तेव्हा उत्तरादाखल दगड म्हणाला, ''काही नको विचारू बाबा. दिवसभर झालेल्या आघातांना तू सहन केलंस, पण आता तुझी पूजा होते आहे, पण मी मात्र एक-दोन आघातांनी घाबरून गेलो. पण आता मात्र रोजच माझ्या शरीरावर आघात होत आहेत. याचा पश्चात्ताप मला आयुष्यभर राहील.''









एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना म्हणाले, ''मी तुम्हाला एका बिकट कामगिरीसाठी जवळच्या प्रदेशात पाठवणार आहे. तेथील लोकांना तुम्ही काही सांगितलं व त्यांनी तुमचं ऐकलं नाही तर तुम्ही काय कराल?''

शिष्यांनी उत्तर दिले, ''तथागत, असं झालं तर आम्ही समजू येथील लोक फारच चांगले आहेत. त्यांनी आमचं ऐकून घेतलं नाही हे खरं. पण उलटून शिव्या तर दिल्या नाहीत?'' 
यावर तथागत म्हणाले, ''ठीक आहे. त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या, काही अपशब्द वापरले तर तुम्ही काय कराल?'' 
शिष्य म्हणाले, ''तरीदेखील आम्ही समजू इथले लोक चांगले आहेत. त्यांनी आम्हाला फक्त शिव्याच दिल्या, मारहाण तर केली नाही.'' 

पुन्हा तथागत म्हणाले, ''पण जर त्यांनी तुम्हाला मारलं तर?'' 
शिष्य म्हणाले, ''आम्ही म्हणू की हे लोक किती चांगले आहेत, कारण यांनी आमचा जीव तर घेतला नाही.'' 

पुन्हा तथागत म्हणाले, ''समजा, त्यांनी तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर?'' 
शिष्य म्हणाले, ''आम्ही असेच समजू की या प्रदेशातील लोक सज्जन आहेत. त्यांनी आम्हाला भगवंताचं काम करतानाच भगवंताच्या पायापाशी पोहचवलं?'' 


शिष्याचे हे उत्तर ऐकून तथागत हसले व म्हणाले, ''तुम्ही कसोटीत उत्तीर्ण झालात.''









एक ऑफिसर त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एका कारकुनाला अद्वातद्वा बोलला. त्या बोलण्यात शिव्यांचाही समावेश होता.

तरीही तो कारकून मात्र शांत उभा होता.

त्याच्यावर आपल्या बोलण्याचा काहीएक परिणाम होत नाही, असे पाहून तो अधिकारी आणखी चिडला. त्याचा राग एवढा नियंत्रणाबाहेर गेला की अक्षरश: तो त्या कारकुनाच्या अंगावर थुंंकला. तरीही तो कारकून शांतपणे समोर असलेल्या वॉश बेसिनकडे गेला व त्याने आपला चेहरा धुतला व तसाच पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसला.

ते पाहून त्याचा अधिकारी शरमला. तो त्याच्या टेबलाजवळ आला व त्याला विचारू लागला, ''मी तुझ्याशी एवढं वाईट वागलो तरीही तू एक चकार काढला नाहीस हे कसे काय?''

तेव्हा तो कारकून म्हणाला, ''जे काम फक्त पाण्याने होऊ शकतं ते करण्यासाठी मी दगड का हातात घेऊ?''



Note: Stories are collected from internet pages and edited. Stories are published on the blog merely to inspire people. No copyright violation intended.

Miles away from the safe place!


Miles away from the safe place!


  Sun eager to touch down the horizon and so did the villagers of Mitikundri.
The other bank of Koel river is like 'Horizon' to them.
Rise and go to work, come back as the day falls.
After rigorously working whole day in Rourkela town, now it was time to go back to the safest place they know, their own home across the river. 
 


Like every day, "The skipper" slowly maneuvered his small boat and parked it safely touching the stairs of Ghat, keeping her floated on the steady flow of muddy water. 

One one end, it was sheer silence.
Though soiled, water was still capable of reflecting the bright sky and rusty texture of the boat.
The other side was a topsy-turvydom, an impatient wait, and a clumsy end to the day.
For some, it was time to devise a strategy to get a place in the small boat.
For some, it was the holy time, time to shred all the evil body (and mind, hopefully) did during daytime.
 For one, it was a time to earn for one last time in a day and............
 for one, it was an easy-to-do job, to pass the personal responsibility to public !


Meanwhile, the un-biased minds, quite unaware about what happening on either end, were enjoying the moment.
The innocent and cheering smile is still there on the face at the end of the day.  


And the moment came, when the boatman asked the commuters to get on board. Cycles lifted in the air, everybody rushed and the chaos grew up. 
Struggle was all about to get a place in 'this' trip. 
Otherwise wait could stretch by twenty ruthless minutes ! 


After accommodating the maximum passengers, just below the safety limit, boat took about turn and started the most-wanted journey.
Journey to experience the climax of wait.
The time to cross the river bed. The worst ever period.
But the boatman never want it to prolong. He has a very little time.
It was just the beginning, he has to transfer many of them, to earn more !



This story repeats endlessly, almost everyday, on many such Ghats of Koel river.
Someone tried to stop it, but the flooding took away the bridge while it was being built.
Many villages like 'Mitikundri' are just a river-bed away from municipal boundary of Rourkela, the third largest city of Odisha.

Safe place is still miles away for the villagers !






Interesting? then please have a look at similar photo story: Transportation in Rourkela. 








काही कथा - भाग ५

काही कथा - भाग ५



एकदा एका राजाने आपल्या राज्यातील लोकांना दोन हिरे दाखवले आणि त्यातला खरा हिरा कोणता हे ओळखावयास सांगितले.

पण कोणालाच ते सांगता येईना. शेवटी एक अंध व्यक्ती तिथे आला व म्हणाला, 'मी सांगतो तुम्हाला त्यातील खरा हिरा कोणता तो.' 

अंध व्यक्ती ते दोन्ही हिरे बाहेर घेऊन आला. त्याने ते दोन्ही हिरे थोडा वेळ सूर्यप्रकाशात ठेवले व नंतर तो ते दोन्ही हिरे घेऊन राजाकडे आला व त्याला खरा हिरा दाखवला. राजा आश्चर्यचकित झाला, कारण अंध व्यक्तीनं योग्य हिरा ओळखला होता. 

त्या वेळी त्याला याबद्दल विचारले गेले तेव्हा त्याने सांगितले, 'जो खरा हिरा असतो तो कधीही गरम होत नाही, काच मात्र गरम होते. गरम होऊन ती तडकतेसुद्धा. पण हिरा मात्र तसाच राहतो. म्हणूनच तर तो अनमोल असतो.'











एका मुलाने कृष्णमूर्तींना विचारले, 'आम्हाला खेळण्यात जितका आनंद वाटतो तितका आनंद अभ्यासात का वाटत नाही?' 

त्यावर त्यांनी उत्तर दिले, 'एखादी गायिका एखाद्या गावात गाण्याचा कार्यक्रम करण्यापूर्वी हजारो तास रियाज करते. गाणे तिचे श्वास झालेले असते, म्हणूनच लोक तिचे गाणे नंतर अनेक दिवस गुणगुणत राहतात. 

बाळा, तुझे शिक्षक जेव्हा त्यांच्या शिकवण्यावर प्रेम करतील तेव्हा शिकणे हे तुझ्यासाठी खेळण्यातकेच आनंदाचे बनले असेल.'














गोष्ट आहे सीताफळांच्या बिया साठवणाऱ्या एका वयस्कर माणसाची 

अकलूज गावचा हा माणूस गेली ३० ते ३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो मुंबईला पुण्याला कामानिमित्त जावं लागतं तो पिशवी भरून त्या घेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेकजण विक्रीला बसलेले असतात 



अलीकडे या माणसानं खास त्यांच्याकडे जाऊन विचारलं , ' कुठून आणता ही सीताफळं ?' ' तुमचे मळे आहेत का ?' 

कुठले मळे साहेब आम्ही गरीब माणसं लोक घाटात शेकड्यानं बिया टाकतात झाडं उगवलीत दरीत सारं फुकटच आम्ही फळं गोळा करतो पिकवतो आणि तुम्हाला विकतो 


शेकडो गरीब कुटुंब चालतात यावर इकडची .' त्या विक्रेत्याकडं गहिवरल्या डोळ्यानं पहात हीव्यक्ती डझनभर सीताफळं विकत घेते पुन्हा बिया गोळा करून घाटात फेकण्यासाठी 










एकदा एका राजाकडून काहीतरी प्रमाद घडला आणि त्याचं प्रायश्चित म्हणून एक दिवस याचक होऊन ‌भिक्षा मागण्याची शिक्षा त्यास मिळाली. 

त्याप्रमाणे राजा भिक्षा मागण्यासाठी सकाळी सकाळी राजपथावर आला. त्याचवेळेस समोरून एक भिकारी ही भिक्षा मागायला त्याच वाटेवरून येत होता. त्यानं राजाला पाहिलं. आता राजाकडे भिक्षा मागून आपल्याला आपलं दारिद्र्य कायमचं दूर करता येईल, असा विचार त्याच्या मनात आला. काय मागावं याचा तो विचार करत असतानाच राजा त्याच्यासमोर आला. 

राजानं भिक्षेसाठी हात पुढे केला. राजाचं ते याचकाचं रूप बघून त्या भिकाऱ्यानं आपल्या कर्माला दोष दिला आणि आपल्या झोळीतील चार दाणे राजासमोर टाकले. 

निराशेनं घरी येऊन त्यानं झोळी फेकली. आणि आश्चर्याने तो बघतच राहिला. 


त्याने जेवढे दाणे भिक्षा म्हणून दिले होते, फक्त तेवढेच दाणे सोन्याचे झाले होते! सर्वच दाणे राजाला का दिले नाही म्हणून तो स्वतःच्या नशिबाला दोष देत राहिला.










Note: Stories are collected from internet pages and edited. Stories are published on the blog merely to inspire people. No copyright violation intended.